Nuksan Bharpai: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रमध्ये यावर्षी म्हणजेच 2021-22 यावर्षी अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे खूप सारे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी सरकारने आता नुकसान भरपाई मंजूर केली आहे. त्याचबरोबर राज्यातील 10 जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. मित्रांनो माहितीनुसार या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 13,600 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे.
अंदाजे आपल्या महाराष्ट्रमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात खूपच जोरदार पाऊस पडला होता. या पावसामुळे शेतकऱ्याच्या शेतातील पिकाचे खूपच नुकसान झाले होते. शेतकऱ्यांची सोयाबीन हे तर आख्खी पाण्याखाली गेली होती. आणि त्याचबरोबर कापूस पिकाचे पावसामुळे खूप पातेगळ झाली. त्याचबरोबर जो कापूस आला होता त्या कापसाला तिथेच कोम येऊ लागली. यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.Nuksan Bharpai
यामुळे सरकारकडून आता राज्यातील दहा जिल्ह्यांना सरसकट 13 हजार 600 रुपये नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत दिली जाणार आहे. हे दहा जिल्हे कोणकोणते आहेत आपण खालील प्रमाणे पाहूयात
- औरंगाबाद
- जालना
- सोलापूर
- परभणी
- सातारा
- हिंगोली
- पुणे
- नांदेड
- लातूर
- बीड
शेतकरी मित्रांनो, वरी दिलेल्या 10 जिल्ह्यांना सरकारकडून आर्थिक मदत म्हणून 13 हजार 600 रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. तर या 10 जिल्ह्यांना मिळवून एकूण 1286 कोटी 74 लाख 66 हजार इतका निधी वितरित करण्यात आला आहे. यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मित्रांनो आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशातील सरकार हे शेतकऱ्यांसाठी काहीना काही नवनवीन योजना राबवत आहे. परंतु अनेक योजना ह्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. यामुळे शेतकरी त्या योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. यामुळे आम्ही आता तुमच्यापर्यंत अचूक माहिती पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. शेतकऱ्यांनो माहिती आवडल्यास पुढे नक्की शेअर करा.Nuksan Bharpai